शहरातील एलईडी दिवे बंद; नागरिकांमधून नाराजी



जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  शहरातील विद्युत खांबावरील अनेक प्रभागातील एलईडी दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांमधून तिर्व नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद प्रशासक मात्र या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
        यामुळे अंधाराचा फायदा घेत अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावरून मोकाट जनावरे, सरपटणारे प्राण्यांचा वावर असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे. याबाबत संबंधितांना फोन केला असता ते काम माझ्याकडे नाही, मला माहित नाही, मी रजेवर आहे. अशी उडवा उडवी ची उत्तरे दिली जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन