Posts

Showing posts from February, 2023

'स्वच्छ जल, स्वच्छ मन’ निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ

Image
पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला.   याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.    बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.   याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण, केन्द्रीय एवं राज्य सरकारमधील मंत्री, मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने निरंकारी स्वयंसेवक आणि सेवादलचे सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवरुन करण्यात आले ज्याचा लाभ देशविदेशातील निरंकारी भक्तगणांनी घेतला.      या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे

जतचे डॉ. राजाराम शंकर सुतार यांची हेनान विद्यापीठ, चीन येथे पोस्ट-डॉक्टरल संशोधनासाठी निवड

Image
  जत वार्ता न्यूज:-         काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जत तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी त्यांच्या शुभ हस्ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथील पदार्थविज्ञान विभागाचे डॉ. राजाराम सुतार यांची हेनान विद्यापीठ, चीन येथे पोस्ट-डॉक्टरल संशोधनासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. येत्या २८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते हेनान विद्यापीठ, चीन येथे रुजू होतील. हेनान विद्यापीठातील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. शानहु लिऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढील संशोधन पार पाडणार आहेत. डॉ. राजाराम सुतार हे मूलतः जत तालुक्यातील पाच्छापूर गावचे आहेत. राजे रामराव महाविद्यालय, जत सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करीत त्यांनी या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. २०१७ साली टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, जपान येथे ०३ आठवडे संशोधन केले आहे. त्यांचे एकूण २२ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले असून ११०० हुन जास्त गुगल सायटेशन मिळाले आहेत. जत मध्ये सलग ०६ आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे नियोजन यशस्वीरीत्या पार पाडले, अनेक एम. एस्सी. च्या विद्यार्थ्याच्या संशोधन प्रकल्पात त

राजे रामराव महाविद्यालयाचे १७ हुन अधिक विद्यार्थी भारत मातेच्या रक्षणासाठी भारतीय लष्करात रुजू

Image
जत वार्ता न्यूज:-         मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. जी जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो, तो तितकाच यशाचा शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसांच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी महत्वाची असते. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे, ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण होय, असा मोलाचा सल्ला राजे रामराव महाविद्यालयातील ज्या विध्यार्थ्यांची भारतीय लष्करात निवड झाली आहे त्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिला.         प्राचार्य डॉ. सुरेश पाटील पुढे म्हणाले की, सैनिक हे आपल्या देशाचे रक्षक असतात ते आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात. सैनिक हे देशाचे अभिमान आहे ते शिस्तप्रिय, धाडसी आणि निस्वार्थी आहेत. त्यांचे जीवन आव्हानानी भरलेले आहे. आणि प्रत्येक आव्हानाला ते हसतमुख चेहऱ्यानी सामोरे जातात. आपण सर्वजण आता सैनिक बनण्यासाठी आपल्या कर्तव्यावरती जात आहात त्यात कोणतीही कसूर करु नका असा मोलाचा सल्ला दिला. राजे रामराव महाविद्यालयाने दि. १० नोव्हेंबर ते दि. ३० नोव्हेंबर २०२३ अखेर महाविद्यालयाम

सरकार तुपाशी अंगणवाडी सेविका मात्र उपाशी

Image
जत वार्ता न्यूज:- अंगणवाडी सेविका व मदतीनस यांचा मानसन्मान राखला गेला पाहिजे तसेच त्यांच्या वेतनातही वाढ झाली पाहिजे. अंगणवाडी सेविका म्हणजे खळाळता ऊर्जा स्त्रोत. आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या अडचणींचा सामना करत हसत मुखाने बालकांच्या सेवेसाठी आणि त्यांना सुपोषण मिळावे यासाठी सतत झटणाऱ्या या माझ्या भगिनी म्हणजे रणरागिनीच. असे उद्गार राष्ट्रवादीचे सागर शिनगारे यांनी अंगणवाडी सेविका यांनी जत पंचायत समिती येथे केलेल्या एक दिवशीय आंदोलनावेळी केले.        यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, अंगणवाडी सेविकांचा विषय खूप गंभीर आहे. दुर्देवाने सरकार गंभीर नाही... कुपोषणाने हजारो बालकांचे दरवर्षी मृत्यू होतात... तिथे कोणते गाजर दाखवणार हे सरकार देव जाणे!!!       एकदा आंदोलन करून देखील ईडी सरकारचे डोळे उघडले नाहीत,अंगणवाडी सेविकाचे मानधन, अंगणवाड्यांचे भाडे,आहाराच्या दरात न झालेली वाढ,सेवा समाप्ती लाभ,आजारपणाच्या रजा, हक्काची उन्हाळी सुट्ट्या,नवीन मोबाईल यासाठी अंगणवाडी सेविका पुन्हा कामबंद आंदोलन सुरु झाले आहे.      महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी गद्दारी करून स्थापन झालेले खोके

जत येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन

Image
स्व. शिवाजीराव काळगी अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम जत वार्ता न्यूज:-         जत तालुक्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, समाजसेवक व राजकारणी स्व. शिवाजीराव काळगी अण्णा यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त जत येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दि24 रोजी सायंकाळी सात वाजता श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. जतकारांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जत मधील काळगी व अक्की परिवाराकडून करण्यात आले आहे.

जत बाजार समितीच्या पोटभाडेकरूंवर कारवाईसाठी लाक्षणिक उपोषण; गौतम ऐवाळे

Image
  जत वार्ता न्यूज:-          शहरातून जाणाऱ्या विजयपूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गालगत जत बाजार समितीच्या मालकीचे गाळे आहेत. शेतकरी, व्यापाऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी अल्पदरात छोट्या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना व्यवसायासाठी ते उपलब्ध करून दिले जातात. सध्याची परिस्थिती पाहता याचा उद्देश चुकीचा ठरला आहे. एकूण दुकान गाळ्यापैकी ९० टक्के गाळ्यांत पोटभाडेकरू ठेवण्यात आले आहेत. हे बाजार समितीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. याबाबत पोटभाडेकरूवर कारवाई करण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण जत बाजार समितीसमोर करणार असल्याचे निवेदन भाजपचे माजी नगरसेवक गौतम ऐवाळे यांनी दिले आहे.       सदरचे निवेदन दुय्यम बाजार समिती जतचे सहाय्यक सचिव, सांगली बाजार समितीचे सचिव तथा प्रशासक, पणन विभाग मंत्रालय मुंबईचे सचिव यांना दिले आहे.        निवेदनात पुढे म्हटले आहे की, सर्व गाळ्यांमध्ये असणाऱ्या पोटभाडेकरू यांना लवकरात लवकर काढून टाकण्यात यावे. तसेच नियमांचा भंग करणाऱ्या मूळ भाडेकरू यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्याकडील गाळे काढून घ्यावेत. सदरचे गाळे सुशिक्षित बेरोजगार गरीब, होतकरू, शेतकरी व व्यापाऱ्यांना व्

जतेतील राजे रामराव महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बारावी परीक्षा व विद्यापीठ परीक्षेवर बहिष्कार..!

Image
जत वार्ता न्यूज:-        बारावीच्या बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत तसेच विद्यापीठ परीक्षेवर जतेतील राजे रामराव महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कर्मचारीच नसल्याने कॉलेज बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या सर्व मागण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे.         या बेमुदत संपास कार्यालयीन अधीक्षक मनोहर मोरे,शिवराम मोईन,संजय राजमाने,बिराप्पा पुजारी,रामा शिंदे,राजू माळी,रियाज गंजीवाले,गजानन कुंभार,निलेश माने,अमोल डफळे, उमेश सावंत,धनाजी हिप्परकर,तुकाराम शिंगाडे,आबा शिरगिरे,राजू ईमडे, अधिक घुंगरे,गोरख हेगडे,बापू सावंत, गजानन कुंभार,श्रीशल बिराजदार, झाकीरहुसेन मुलाणी,अक्षय वाघमोडे व बिरुदेव सदाकळे आदी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

ग्रामपंचायत सदस्या सरसाबाई सोनुरे यांच्या माध्यमातून शासकीय मेळाव्याचे आयोजन

Image
  जत वार्ता न्यूज नेटवर्क:-          जत तालुक्यातील अचकहळ्ळी येथील ग्रामपंचायत सदस्या सौ सरसाबाई सोनुरे व युवा नेते रोहीत सोनुरे यांच्या माध्यमातून निरनिराळे शाशकीय मेळावा आयोजित करण्यात आला असून.       या मध्ये गावात "आयुष्यमान भारत कार्ड,गोल्डन कार्ड,मोबाईल नंबर लिक" असा अनेक योजना राबविण्यात येणार आहे.याचा फायदा या गावातील नागरिकांना होणार असून. याचे उद्घाटन सोमवार दि 20 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरवात होणार आहे. हे अभियान गावामध्ये दोन दिवस चालणार आहे. तरी गावामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या सौ.सारसाबई गुलाब सोनुरे यांनी केले आहे.       ग्रामपंचायत सदस्या सौ.सारसाबई गुलाब सोनुरे बोलताना म्हणाल्या की, केंद्र सरकारने सुरु केलेल्या  योजना ही गरजू व गोरगरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळावा या निस्वार्थ हेतूने गावातील नागरिकांना मिळण्यासाठी काम करीत आहेत.       हे अभियान ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार व मंगळवार या दिवशी आहे.सर्वसामान्य नागरिकांना आजही केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नाही.ही माहित