Posts

Showing posts from March, 2023

सेवेला निवृत्ती नसते: प्रा. किसन कुराडे

Image
डॉ. निर्मला मोरे यांच्या सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार जतवार्ता न्यूज नेटवर्क:- माणसाच्या आयुष्यात बालपण, तारुण्य, प्रौढावस्था व वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे असतात. नोकरीमध्ये दीर्घकालीन सेवा करूनही प्रत्येक टप्प्यात माणसाला काम करावेच लागते. याचे आदर्श उदाहरण म्हणून आपण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याकडे पाहू शकतो. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाची गंगा गरीब, वंचित व खेडोपाड्यातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यभर सेवा केली. सेवेला निवृत्ती नसते. डॉ. निर्मला मोरे यांच्याकडूनही आयुष्यभर सेवा घडत राहिल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसन कुराडे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयात मराठीच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. निर्मला वसंतराव मोरे यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या व सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी प्रशासन सहसचिव प्राचार्य पुंडलिक चव्हाण, विद्यावाचस्पतीचे मार्गदर्शक डॉ. दत्ता पाटील, साहित्यिक जी. पी माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.

जत येथील सुप्रसिद्ध श्री मायाक्का देवी व भाग्यवंती देवी ची यात्रा उत्साहात संपन्न

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- येथील छत्रपती शिवाजी पेठेतील सुप्रसिद्ध श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे अत्यंत उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. जत राष्ट्रवादीचे नेते सुरेश राव शिंदे सरकार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अलका शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिवसेना जत तालुका संपर्कप्रमुख योगोश जानकर, तसेच जतचे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व भारत सरकारच्या सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया चे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, बाबासाहेब माळी यांनी यात्रेस शुभेच्छा दिल्या.       देवस्थानचे पुजारी सौ सुवर्णाताई आलगूर व बसवराज अलगुर महाराज यांच्या नेतृत्वाखाली यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरती, होमहवन, भजन, कीर्तन तसेच दुपारी महाआरती, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जत शहरातून देवीच्या पालखीची व सभेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धनगरी ढोल पारंपारिक वाद्यांचा गजरात भंडाऱ्याची उधळण करीत संपूर्ण जत शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिरासमोर हेडाम हा शस

जत येथे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन

Image
ह.भ.प. मोहन महाराज घोटीकर यांचे कीर्तन जतवार्ता न्यूज नेटवर्क: -        श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जत येथे ह.भ.प. मोहन पाटील ( घोटीकर ) महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहीती ट्रस्ट चे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.        यावेळी बोलताना ते म्हणाले की,आम्ही दरवर्षी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो. जत सांगली या मार्गावर असलेल्या आर.आर.काॅलेज पाठीमागील राजे छत्रपती शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे. या मंदिरात महाराष्ट्रातील अनेक नवोदीत कीर्तनकार यांचा झी टि.व्ही.च्या माध्यमातून दोनवेळा किर्तन महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.       श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दर पोर्णीमेदिवशी पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा,त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, नंतर बारावाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव व दुपारी एक ते तीन वाजेपर्

तरूण वयातचं जीवनाला आकार मिळतो: डॉ. अरुण शिंदे

Image
राजे रामराव महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न | गुणवंत प्राध्यापक, खेळाडू व विद्यार्थ्यांचा केला सन्मान जतवार्ता न्यूज नेटवर्क:- समाजमाध्यमाच्या या युगात तरुण विद्यार्थी सैरभैर झाले असून विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य व करिअरकडे लक्ष दिले पाहिजे. आयुष्याचा आनंद घेत या वयातचं जीवनाला खरा आकार मिळतो, असे प्रतिपादन प्रेरक वक्ते डॉ. अरूण शिंदे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, कार्याध्यक्षा डॉ.  निर्मला मोरे उपस्थित होत्या.           आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे म्हणाल्या, आजच्या तरूणांमध्ये प्रचंड उर्जा आहे. या उर्जेचा वापर चांगल्या कार्यासाठी केला तर जीवन सुखी व आनंदी होते. खडतर परीस्थितीतुनच माणसाची समृद्धी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करून आपले जीवन घडवावे.         प्रारंभी विद्यार्थ्यांनी केलेल्या विव

जत तालुक्यातील कोसारी येथे विहिरीच्या पाण्यावरून वाद | काका व पुतण्याचा तलवारीने खून | चौघेजण गंभीर जखमी | तालुक्यात खळबळ

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील कोसारी येथे सामाईक विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून  चुलता व पुतण्याचा तलवारी, कुऱ्हाडीचे घाव घालून भावकीतीलच कुटुंबाने खून केला. यात चौघे जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. खूनाच्या या घटनेने जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.        विलास नामदेव यमगर (वय ४५) व प्रशांत दादासाहेब यमगर (२३, दोघेही रा. कोसारी ता.जत ) अशी मृतांची नावे असून, दादासाहेब नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर (सर्व रा. कोसारी ता.जत जिल्हा सांगली ) यांच्यासह एक महिला गंभीर जखमी आहे. ही घटना आज, शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कोसारी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील म्हारनूर वस्तीजवळ घडली.        कोसारीजवळ यमगर कुटुंबीयांची मोठी शेती आहे. या शेतीतील चार गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून भावकीतच वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी यमगर भावकीत पाण्यावरून पुन्हा वाद उफाळला.दहा ते पंधरा हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार,चाकू, कुऱ्हाड, दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. त्यात विलास यमगर व प्रशांत यमगर हे चुलते-पुतणे ठार, तर चौघे ज

महिला दिनानिमित्त भगिनी निवेदिता वसतिगृहास धान्याचे वाटप

Image
 जनसेवक डॉ. प्रविण वाघमोडे यांचा स्तुत्य उपक्रम  जतवार्ता न्यूज नेटवर्क : जगातील महिला दिनाचे औचित्य साधून जत येथील पशुसेवक म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करणारे डॉ. प्रविण वाघमोडे यांनी जत येथील भगिनी निवेदिता निराधार मुलींच्या वसतिगृह येथे आवश्यक असणाऱ्या अन्न धान्याचे वाटप केले यावेळी बंटी नदाफ, प्रमोद ऐवळे, पत्रकार अमोल कुलकर्णी, पत्रकार गोपाल पाथरुट, महेश गुरव, राहुल मालाणी, प्रविण गडदे, आदेश जाधव, सागर कोळी, सचिन कुकडे, योगेश शिंदे, कुलदीप होर्तीकर, पत्रकार शशिकांत हेगडे, गुरू माळकोटगी, निवेदिता संचालिका मुळे मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना बंटी नदाफ यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिला दिनानिमित्त असे सामाजिक सहकार्य दर्शवणारे उपक्रम गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी नदाफ यांनी केले.       आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना डॉ. वाघमोडे म्हणाले की, अनावश्यक खर्च करून कार्यक्रमाला फाटा देत, शासन आणि कार्यालयीन सोयी अभावी पण उत्तम प्रकारे अनाथ आणि निराधार कुटुंबातील मुलींचे संगोपन आणि शिक्षण देत त्यांना समाजात स्थान मिळवून देणाऱ्या संस्था असणाऱ्या भगिनी निवेदिता सा

जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने "हात से हात जोडो" अभियानास सुरुवात

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने आज हाथ से हाथ जोडो या कार्यक्रमाची सुरुवात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत जत येथे करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते सुभाष खोत, कादर नायकवडी, अमित पारेकर , जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिरादार, जत पं. स. माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा बँक संचालक सरदार पाटील, जि. प. सदस्य महादेव पाटिल, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, पं. स. सदस्य रवींद्र सावंत ,बाजार समिती सभापती संतोष पाटिल, नगरसेवक परशुराम मोरे, महादेव कोळी, अशोक बन्नेनवर, सलीम पाच्छापुरे ,तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.      यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात देशातील महांगाई, देशाची सध्यस्थिती यावर भाष्य केले. मा.राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पोहचून काँग्रेसच्या विचाराचा प्रसार करण्याचे तसेच देशातील जनतेला त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

चिखलगी भुयारमध्ये तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा; तुकाराम महाराज

Image
आठ व नऊ मार्चला विविध कार्यक्रम जतवार्ता न्यूज नेटवर्क: - चिखलगी भुयार मठ येथे आठ व नऊ मार्च रोजी  जगतगुरु तुकाराम महाराज बीज व वैकुंठ गमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तुकाराम बीज निमित्य प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दोन दिवस हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.         तुकाराम बाबा म्हणाले, श्री संत बागडेबाबा यांनी चिखलगी भुयार मठ येथे तुकाराम बीज वैकुंठगमन सोहळा आयोजित केला. तेव्हापासून आतापर्यत हा अखंड सोहळा सुरू आहे. दोन दिवसांचा हरिनाम सप्ताह, धार्मिक कार्यक्रम मठात पार पडतात. या सोहळ्याला जत, मंगळवेढासह राज्यभरात श्री संत बागडेबाबा यांचे असलेले भक्त आवर्जून उपस्थित असतात. तुकाराम बीज दिनी चिखलगी भुयार येथे भक्तांचा मेळाच जमतो. हजारो भक्तांची उपस्थिती असते.        यंदा आठ मार्च रोजी तुकाराम बीज वैकुंठगमन सोहळ्यास सुरुवात होणार आहे. नऊ मार्च रोजी दुपारी बारा वाजता फुले व गुलाल कार्यक्रमाने सोहळ्याची

उपेक्षितांना न्याय देण्याचे काम परशुराम मोरेनी केले, अशा जनसेवकास भविष्यात जत शहराचे नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी; आमदार सावंत

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- गोरगरीब वंचित व उपेक्षित लोकांना न्याय देण्याचे काम जागर फौंडेशनच्या माध्यमातून माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे हे सतत करत असतात. त्यांची ही सामाजिक बांधिलकी जत शहरातील जनता विसरणार नाही, असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले. येथील बचत भवन येथे जागर फौंडेशनच्या वतीने "आयुष्मान भारत कार्ड" अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.       यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी जागर फौंडेशनची स्थापना करून शहरात सामाजिक बांधीलकी जपली आहे. या फौंडेशनचे सर्व सदस्य शहरातील गोरगरीब, वंचित व उपेक्षित नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहेत. शहरात स्वच्छता मोहीमेतून परशुराम मोरे यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. कोरोना काळात जागर फौंडेशनचे काम हे कधीही विसरता येण्यासारखे नाही. शासकीय योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम मोरे यांनी केले आहे. रेशनकार्ड असो घरकुल, संजयगांधी निराधार योजना, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शौचालय अशा शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्याचे काम जागर फौंडेशनने केले आहे. स

मनसेच्या इशारानंतर जत तालुक्यात म्हैसाळचे पाणी दाखल

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- पालकमंत्री तथा कामगारमंत्री, सुरेश खाडे यांनी त्यांच्या मिरज मतदारसंघात म्हैसाळचे पाणी सोडले आहे. पण जत, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी सोडले नसल्याचा निषेध करत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी जतला म्हैसाळचे पाणी सोडा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या आंदोलनाच्या इशारानंतर म्हैसाळचे पाणी सोडण्यात आले आहे. तालुक्यातील डोरली येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले आहे.      तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जत तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. जनावरांना, पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहेत. विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळी कमी होत आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आवर्तन २० फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आले आहे. सदरचे पाणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी फक्त मिरज तालुक्यात सोडले आहे. दुष्काळी कवठेमहांकाळ व जत तालुक्याला पाणी सोडलेले नाही.      पालकमंत्री हे जिल्ह्याचे आहेत की केवळ मिरज तालुक्याचे आहेत हा दुष्काळी भागातील जनतेला पडलेला प्रश्न आह

सिद्धार्थ शिक्षण संकुल जतच्या वतीने कार्यशाळा संपन्न

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-   जत तालुक्याचे भाग्यविधाते, राजकारण, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारे माजी आमदार कालकथित उमाजीराव सनमडीकर (काका) तालुक्यातील दुष्काळी ग्रामीण भागातील ऊसतोड मजूरांच्या मुलासाठी शिक्षणाचे द्वार खुले व्हावे, ते शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी आश्रमशाळा सुरू करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम कालकथित उमाजीराव सनमडीकर यांनी केले होते. त्यांचा हा शैक्षणिक वारसा असाच पुढे चालू ठेवण्याचा मानस मनामध्ये बाळगून त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर आणि त्यांच्या पत्नी डॉ.वैशाली सनमडीकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सतत वेगवेगळे शिबीर, कार्यशाळा, व्याख्यानमाला, चर्चासत्रे यांचे आयोजन करीत असतात. त्यांच्याच एक भाग म्हणून आज सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी आणि श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन,जत यांच्या वतीने सर्व शाखामधील कर्मचाऱ्यांसाठी सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येठे, एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते."  अलीकडील शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत या विषयाव

जत तालुक्यातील बिळूर येथील म्हैशाळ योजनेचे कामे त्वरित पूर्ण करा | ग्रामस्थांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

Image
उर्वरित काम तातडीने पूर्ण करून म्हैसाळ योजनेचे पाणी एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, खिलरवाडी, जिरग्याळ, शेळकेवडी, मिरवड  या गावाना द्यावी यासाठी मा. उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील बिळूर येथील अपूर्ण असणारी म्हैशाळ योजनेचे कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी व म्हैशाळ योजना अधिकारी यांना उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून म्हैसाळ योजनेचे पाणी एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, खिलरवाडी, जिरग्याळ, शेळकेवडी, मिरवड या गावाना द्यावी यासाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले आहे. यावेळी प्रकाश बिरादार, रमेश कोरे उपसरपंच एकुंडी, भिमाना बिरादार, वीरेंद्र पाटील, राजू शेळके, लोकेश पाटील, इरप्पा यंगरे, पोपट सवदे, भिमाना बिरादार, भाऊसाहेब लोखंडे सरपंच खिलरवाडी, द्रौपदी लोखंडे, शिवपुत्र नाईक, परशराम म्हेत्रे अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.       निवेदनात असे म्हंटले आहे की, म्हैशाळ पंपगृह विभाग क्र. २ मधील बिळूर क्र. २ ची कॅनॉल चे कामे १५ - पूर्ण झालेली आहेत म्हैशाळ योजनेतून पाणी सोडल्यास  एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, खिलरवाडी,

फाळणी १२ ची नोंद घालण्यास विलंब | अर्जदाराची तक्रार | संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषण; सुनील बागडे

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील डफळापुर येथील तत्कालीन तलाठी अलका भोसले व मंडळ अधिकारी सलीम मुलाणी यांचे वर सेवा हमी कायदा २०१५ नुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी निवेदनाव्दारे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्याकडं केली आहे.        जत तहसिलदार जत यांनी दि.१० जून २०१९ रोजी आदेश क्र. ९४०/२०१९ नुसार सर्कल सिकंदर  भालदार यांनी यांचे फाळणी १२ ची नोंद घालनेसाठी आदेश दिला आहे. ही नोंद घालणे व हित्त संबधितांना नोटीसा देणे व पोच घेणे याचा कालावधी नियमानुसार सदर २१ दिवस असा आहे. परंतु सदर तलाठी यांनी ४ महिन्यानंतर फेरफार १२५९० ची नोंद घातली आहे.       मंडळ अधिकार यांनी आलेल्या तक्रारी अर्जाची दखल न घेता ४ महिन्यानंतर फिफो प्रणाली नुसार फेरफार १२५९० नामंजूर केला आहे. फाळणी १२ नामंजूर करण्याचा अधिकार महसूल खात्यास नाही व न्हवता. सदर प्रकरणात तक्रारदार यांनी अप्पर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी जत यांच्या कडे लेखी तक्रार दिली आहे. तताफी जत तहसिलदार जत यांनी अध्याप त्याची दखल घेतली नाही.  तक्रारदार यांनी जत तहसिलदार जत यांना मंडळ अधिकार

जागर फौंडेशन आयोजित 'आयुष्मान भारत कार्ड' अभियान | आमदार सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत येथील जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्या वतीने "आयुष्मान भारत कार्ड" हे अभियान शहरात गेले अनेक दिवसापासून सुरू आहे. रविवार दि. ५ मार्च रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परशुराम मोरे यांनी केले आहे. येथील बचत भवन या कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे उदघाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.         परशुराम मोरे म्हणाले, केंद्र सरकारने सुरु केलेली ही योजना गरजू व गोर गरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ जत शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी जागर फाऊंडेशनचे सदस्य काम करीत आहेत. शहरातील गोरगरीब व सामान्य कुटुंबातील लोकांना सरकारच्या योजनेचा लाभ व्हावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. आमच्या कुंटुबाला समाजसेवेचा वारसा आहे. आमचे वडील शहरातील गोरगरीब व वंचीत घटकातील समस्या ह्या स्वतःच्या मानून त्या सोडवण्यासाठी काम करीत राहिले. त्यांचे स्वप्न उराशी बाळगून मी काम करीत आहे."आयुष्मान