Posts

Showing posts from July, 2023

अण्णा भाऊ साठे यांना जत मध्ये अभिवादन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-        लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त जत येथील महात्मा फुले नगरमध्ये त्यांच्या प्रतिमेस डी. पी.आय.चे जिल्हाध्यक्ष अविनाश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जतपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष(भूपेंद्र) कांबळे, बाजी केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती.       यावेळी बोलताना अविनाश वाघमारे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे महान शाहीर होते. खरे पाहता त्यांना शासनाने भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणे गरजेचे होते. उपेक्षित वंचितांना न्याय देण्याचे काम अण्णाभाऊंनी केले होते. त्यांच्या कार्याची दखल आज पर्यंत घेतली नाही ती घ्यायला पाहिजे. तसेच माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली हे गीत अण्णाभाऊंनी जगभर नेले असे मत व्यक्त केले. यावेळी बंडु कांबळे, सोनु कांबळे, अनंत वाघमारे, संतोष साबळे अशोक ऐवळे, ऋतिक कांबळे, दता हेगडे, विनोद हेगडे, राजु कांबळे, अजित वाघमारे, संतोष जतकर, पदम उमराणी, दर्याप्पा जतकर आदि उपस्थित होते.

जतच्या प्रश्नांसाठी डफळापुरात सांगली मार्ग रोखला; शेकडो शेतकरी रस्त्यावर

Image
राष्ट्रवादीचे नेते मन्सूर भाई खतीब आक्रमक  जतवार्ता न्यूज नेटवर्क:-         पावसाने ओढ दिल्याने जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जतचे प्रश्न तातडीने सोडवावेत, या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर भाई खतीब यांच्या नेतृवाखाली डफळापूर येथे जत सांगली मार्ग रोखून धारण्यात आला. या आंदोलनात 20 गावातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यामुळे सांगली मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. 140 विसर्गाने या भागाला पाणी मिळावे अशी जोरदार मागणी करत,  जिरग्याळ, एकुंडी, मिरवाड, वज्रवाड या भागाला प्रधान्याने पाणी मिळाले पाहिजे, अशी जोरदार मागणी मन्सूर खतीब यांनी केली आहे.       यंदा  तालुक्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे पिके वाळून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही.  त्यामुळे म्हैसाळ योजना चालू करून तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यात यावे, डफळापूर जिल्हा परिषद गटातील गावांना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे, यामुळे  विजेच्या मोटरी जळत असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्ण

दुष्काळ जाहीर करा अन्यथा तहसील कार्यालय आवारात जनावरे सोडू; जत विधानसभा संपर्कप्रमुख तानाजी गुरव

Image
  जत तालुका दुष्काळ जाहीर करावा व अन्य मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व वंचित आघाडी यांच्या वतीने शिवसेना जत विधानसभा संपर्क प्रमुख तानाजी गुरव यांचे उपस्थित जत तहसीलदार यांना देण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास तहसील कार्यालय आवारात जनावरे सोडू असा इशारा यावेळी देण्यात आला.    यावेळी तालुका प्रमुख (पूर्व) नागनाथ मोटे, तालुका प्रमुख (पश्चिम) संजयकुमार सावंत, तालुका संघटक, अमित (बंटी )दुधाळ, तालुका संपर्क प्रमुख तात्या कोळी, कामगार सेनेचे दिनकर पतंगे, शिव उद्योग सेना उपजिल्हा प्रमुख, रफीक शेख, शहर प्रमुख विजयराजे चव्हाण, वंचित आघाडीचे संभाजी चंदनशिवे, हुवाळे सर, महिला आघाडीच्या सौ.शिंदे, उटगीचे विभाग प्रमुख नाटेकर, युवासेना तालुका प्रमुख महेश कोडग, जेटलींनी कोरे, ज्ञानेश्वर धूमाळ, सुरेश घोडके, बाबानगर, जेष्ठ शिवसैनिक ईराण्णा पाचंगे उपस्थित होते.

जतकरांनो चिंता करू नका, शासन तुमच्या पाठीशी | मंत्री सुरेश खाडे यांनी दिली जतकरांना ग्वाही | तुकाराम बाबा महाराज यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्याची भेट

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-          पाऊस लांबल्याने जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जतकरांनो चिंता करू नका शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला आहे.         चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. तुकाराम बाबांच्या या आंदोलनाला विविध राजकीय व सामाजिक संघटनेने उत्स्फूर्त पाठिंबा दिला.         आंदोलन यशस्वी झाल्यानंतर तुकाराम बाबा महाराज यांच्यासह बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब  रास्ते, रामदास शिंदे, भाऊसाहेब भोसले,  तानाजी भोसले धुळा कोळेकर , सूर्यकांत ओलेकर ,खंडू मडके, रामचंद्र रणशिंगे, विवेक टेंगले, विक्रम कांबळे, उमेश कोरे, मोहसीन मणेर, सुरज मणेर, अजित कारंडे, अभिराजे शिंदे, दिगंबर कांबळे, शशिकांत डांगे, पांडुरंग कोळेकर, रामदास सावंत, प्रथमेश कदम, दीपक कोळेकर, पिंटू मोरे, विशाल वाघमारे, वैभव जाधव, श्याम मोरे तुका

कुंभारी येथे पदवी शिक्षणास शिवाजी विद्यापीठाची मान्यता

जतवार्ता न्यूज नेटवर्क:-           जत येथील दि फ्रेंडस असोसिएशन जत संस्थेच्या  कुंभारी शाखेत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला  शिवाजी विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे ही संस्था उच्च शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सतत कार्य करीत असते.       त्यामुळे जत पश्चिम भागातील बहुसंख्य विद्यार्थ्याना महाविद्यालयीन शिक्षणाची सोय झाली आहे. तरी विद्यार्थ्यांनी आर्ट्स,कॉमर्स,सायन्स या पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षाच्या वर्गाला प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.        कुंभारी, डफळापुर, बेळंकी, अंकले, बाज, डोरली, ढालगाव, चोरोची, नागज, हिवरे, धावडवाडी, प्रतापपुर, गुळवंची, बेवनुर, वाळेखिंडी, शेगाव, कोसारी, बागेवाडी, बिरनाळ या परिसरातील व भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना या महाविद्यालयाचा फायदा होणार आहे. या महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, उच्च प्राध्यापक वर्ग, सुसज्ज व स्वतंत्र प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, भव्य क्रिडागंण, NCC व NSS  या सोयींमुळे गरीब व गरजु विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी बीए , बी कॉम , बीएससी च्या प्रथम वर्षासाठी प्

जागर फाउंडेशन प्रसिद्धी आणि पुरस्कारासाठी नाही तर सामाजिक कर्तव्य म्हणून काम करतो; परशुराम मोरे

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-       शहरातील दुभाजकासाठी सोडलेल्या अरुंद खड्डयात दुचाकी वाहने जाऊन अपघात झाले यामध्ये काहीजण जायबंदी झाले तर काहीजणांचा बळी गेला म्हणून जागर फाउंडेशनच्या माध्यमातून मी अध्यक्ष परशुराम मोरे आणि माझे सहकारी मित्र आम्ही  मिळून  जत विजापूर महामार्गावरील  दुभाजकासाठी  सोडलेली चर खड्डे काँक्रिट ने बुजवून तात्पुरती सोय करून अपघातास प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेतला जेणेकरून कुणाचा बळी जावू नये कोण जायबंध होऊ नये यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रयत्न करत आहे.        अजून काम पूर्ण झाले नाही कारण हा रस्ता महामार्ग असून वाहनांची वर्दळ असल्याने जे काँक्रिट केलं जातं आहे ते वाळले पाहिजे काही तांत्रिक अडचण आहेत त्या समजून घ्या काँक्रिटच्या दोन्ही बाजूस बरिकेट कमी ऊपलब्ध आहेत पोलीस ठाणे 6 आणि नगरपालिकेचे 4 बरिकेत उपलब्ध आहेत जेवढे बरीकेट आहेत त्यानुसार हे काम करत आहोत.        पण वाहन चालकांच्या नाव पुढे करून आम्ही जागर फाउंडेशनने प्रसिद्धीसाठी काम करतो असा जावईशोध लावला जात आहे. याबाबत कोणतीही खात्री न करता अशा नाउमेद करण्याच्या पोस्ट लिहून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था

केवळ प्रसिद्धीसाठी केलेले काम?

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-          जत शहरातून जाणारा विजयपूर-गुहागर ह्या राष्ट्रीय महामार्गवरील दुभाजकासाठी अर्धामिटर अंतर सोडल्यामुळे वाहतुकदार व वाहनचालकासाठी धोक्याचा बनला आहे.       दुभाजकासाठी सोडलेल्या अरुंद खड्ड्यात दुचाकी वाहने जाऊन अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामध्ये काहीजन जायबंदी झाले आहेत. तर काहीजनांचा बळी गेला आहे.       याची दखल घेऊन येथिल जागर फाउंडेशन चे अध्यक्ष परशुराम मोरे व सहकार्यानी विजयपूर-गुहागर या महामार्गावरील दुभाजकासाठी सोडलेले खड्डे सिमेंट काॅन्क्रीटने मुजवले आहेत. परंतु हे काम जागर फाउंडेशनने अर्धवटच केल्याने फाऊंडेशनने हे काम केवळ प्रसिद्धीसाठी हे केले आहे की काय अशी चर्चा वाहनचालकातून करण्यात येत आहे.

जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर करा | शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यायासमोर आंदोलन | हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:-        जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्री. संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.        तुकाराम बाबा महाराज म्हणाले, यंदा पावसाने ओढ दिल्याने जत तालुक्यातील स्थिती भयावह झाली आहे. पाणी व जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली असताना शासन व प्रशासनला मात्र याबाबत गांभीर्य नाही हे दुर्देव. पावसाने ओढ दिल्याने हक्काचा खरीप हंगाम वाया गेला आहे. पेरणी न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तेव्हा जिरायती शेतकऱ्यांना हेकटरी २५ हजार,  बागायत शेतकऱ्यांना ५० हजार रुपये किमान अनुदान द्यावे व ते त्यांच्या खात्यावर जमा करावेत. जत तालुक्यातील काही भागात म्हैसाळचे पाणी आल्याने हिरवळ दिसत असली तरी प्रत्यक्षात तेथील पिके जळून गेली आहेत. जत पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. तेव्हा तातडीने त्याची दख

मंत्री रामदास आठवले १४ जुलै रोजी जत दौऱ्यावर

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-         केंद्रीय मंत्री रामदास आठवले दि.१४ जुलै रोजी जत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते जत शहरातील रस्ता डांबरीकरण व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.       या दोन्ही कामांसाठी आठवले यांच्या स्थानिक विकास निधीतील फंड मंजूर झाला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ सरवदे व. विवेक कांबळे हे आहेत. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुपारी १ वाजता डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यापारी, मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कांबळे यांनी केले.

गाईच्या मुखात अडकलेला तांब्या काढण्यात यश

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-       जत शहरातून मोकाट फिरणा-या गाईच्या मुखात अडकलेला तांब्या काढण्यात गोरक्षक अलगुर महाराज व पशुवैद्यकीय डाॅक्टर प्रविण वाघमोडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश! सर्व स्थरांतून दोघांचेही होत आहे अभिनंदन.      याबाबत सविस्तर माहीती अशी की, जत शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत आहेत. या जनावरांवर चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ही जनावरे चारा पाण्याच्या शोधात दारोदार फिरत आहेत. परंतु या जनावरांचे पोट भरत नाही. त्यामुळे ही जनावरे रस्त्यावर पडलेली प्लॅस्टिक कागदात लोकांनी टाकलेले अन्न खाऊन आपली भूक भागवीत आहेत.      नुकतेच जत शहरात चारा व पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या गाईने तांब्यातील अन्न खात असताना तो तांब्या या गाईच्या जबड्यात अडकला. तांब्या जबड्यात अडकल्याने ही गाय सैरभर होऊन वाट दिसेल तिकडे पळत होती. जत शहरातील अनेक जनानी गाईच्या जबड्यात अडकलेला हा तांब्या काढण्याचा प्रयत्न केला परंतु गाई बिथरली असल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.        गुरूवारपासून ही गाय आपल्या जबड्यात तांब्या घेऊन गावभर भटकत होती हे सर्व पाहून शहरातील नागरिक हळहळ व्

मृदा व खडक संग्रहालय हा एक स्तुत्य उपक्रम: प्राचार्य अभयकुमार साळुंखे

Image
राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभागाचा पुढाकार जतवार्ता न्यूज नेटवर्क:-          जगभरातील विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे मृदा व खडकाचे नुकसान होत असताना त्याचे संवर्धन व माहिती संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थी व अभ्यासकांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभाग करत आहे, अशा शब्दात श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी कौतुक केले. ते राजे रामराव महाविद्यालयाला दिलेल्या भेटीमध्ये महाविद्यालयातील विविध विकास कामांचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे भाषा प्रयोगशाळा व इतिहास विभागातील ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.         पृथ्वीतलावर अनेक प्रकारचे खडक व मृदेचे प्रकार पाहायला मिळतात. खडकाचे अग्निज, स्तरित व रूपांतरित हे मुख्य प्रकार तसेच अनेक उपप्रकार ही आहेत. तसेच मृदेचे ही काळी मृदा, लाल मृदा, चुनखडी इत्यादी प्रकार पडतात. या खडकात व मृदेत अनेक खनिजे असतात. या सर्वांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा, यासाठी राजे रामरा

जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी व मेहनत महत्वाची; संभाजीराव सरक

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:-     "विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत ही अत्यंत महत्त्वाची आहे. दे रे हरी, खटल्यावरी! अशी वृत्ती आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. " असे प्रतिपादन श्री.संभाजीराव सरक यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथील रसायनशास्त्र विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  बोलत होते .              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे रामराव महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. सतीशकुमार पडोळकर हे उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते म्हणाले, करियर साठी शहरात जाताना आपल्या मनामधील न्यूनगंड बाजूला करून कामाला लागा. नक्कीच एकेदिवशी तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहचाल. पण त्यावेळी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो, हे विसरू नका."        यावेळी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के. के. रानगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्

जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उद्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- पावसाअभावी जत तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. अवकाळी किंवा कसलाही पाउस झाला नसल्याने पिण्याचा पाणीप्रश्न तसेच जनावरांचा चारा आदी प्रश्नाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने त्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी म्हैसाळ योजनेचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना जनावरांसहीत इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे. या व इतर मागण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने शुक्रवार दि. ७ रोजी जत तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आप्पाराया बिराजदार, तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.        पत्रकात पुढे नमूद केले आहे की, कायम दुष्काळी व अवर्षण प्रवणग्रस्त जत तालुका आहे. पावसाअभावी चालू वर्षी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात पाऊसच झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे शासनाच्या निदर्शनास आणून दे

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ नुतन कार्यकारणी जाहीर

Image
ग्रामसेवक संघातील १० सभासदांचा युनियन मध्ये जाहीर प्रवेश जत/प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ तालुका शाखा जत ची सर्वसाधारण सभा जत येथे आयोजित करण्यात आली. यावेळी जत तालुका संघातुन माझी तालुका अध्यक्ष महादेव शिलेदार, दादासाहेब चव्हाण यांचे नेतृत्वाखाली अरुण शिंदे, शिवाजी जाधव,विलास भोसले,अनिल ओलेकर,विनायक माळी,दत्ता माने, दत्ता साळे,कल्पना गवळी इत्यादी सभासदांनी युनियन मध्ये जाहीर प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले.          यावेळी सभेमध्ये नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष पदी श्री अगतराव काळे,मानद अध्यक्ष पदी आप्पाराव बिरादार सचिव पदी राजेश ननवरे, सहसचिव पदी दत्ता साळे,उपाध्यक्ष पदी दिलीप शिंगे,चंद्रप्रभा तिटकारे कोषाध्यक्ष पदी कादर नदाफ,कार्याध्यक्ष पदी अनिल ओलेकर,प्रसिध्दी प्रमुख शंकर कोरे,कायदेशीर सल्लागार बापु खरमाटे,संघटक पदी आनंदा राठोड, धनाजी धवन,सुदर्शन जाधव,माधुरी बसर्गी,साहिला मणेर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पैगंबर नदाफ,हुसेन पाटील,सुरेश खोत यांची एक मताने निवड करण्यात आली.        यावेळी नुतन तालुका अध्यक्ष म्हण

जत येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरूपोर्णीमा मोठ्या उत्साहात साजरी

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीनै आज गुरूपोर्णीमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली.सकाळी दहा ते बारावाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.        त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर पुष्प वाहण्याचा कार्यक्रम पार पडला नंतर श्री.स्वामींची आरती करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्व श्री.स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच प्रत्येक भक्ताला सफरचंद वाटप करण्यात आले.       श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे कुटुंबप्रमुख व झी टाॅकीज फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.सागर महाराज बोराटे यांच्या संकल्पनेनुसार यावर्षीही श्री.स्वामी समर्थ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.        हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, लक्ष्मण उर्फ पिंट

चिक्कलगी भुयारमध्ये गुरुपौर्णिमेदिनी अन्नक्षेत्राचा शुभारंभ; दिवसभर सुरू राहणार अन्नक्षेत्र- तुकाराम बाबा

Image
चिक्कलगी भुयारमध्ये गुरुपौर्णिमेदिनी अन्नक्षेत्राचा शुभारंभ प्रसंगी उदघाटनप्रसंगी मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, अमृत पाटील, सिद्धाप्पा मेडीदार व भाविक जतवार्ता न्यूज नेटवर्क:- भुकेलेल्याना अन्न, तहानलेल्यांना पाणी देण्याचा दशसुत्री संदेश देणारे राष्ट्रीय संत गाडगेबाबा,  समाजसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून कार्य करणारे वैराग्य संपन्न  श्री संत बागडे बाबा यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी सामाजिक, अध्यात्मिक कार्यात आपला एक वेगळा ठसा व वेगळी ओळख समाजकार्यातून जनमानसात निर्माण केली आहे.कोरोना, महापूर असो की कुठलीही आपत्ती मदत नवे कर्तव्य म्हणून मदतीचा हात देणारे तुकाराम बाबा महाराज यांनी चिक्कलगी भुयार येथे गुरुपौर्णिमेपासून अन्नछत्र सुरू केले आहे.        सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत चिखलगी भुयार येथे येणाऱ्या भाविकांसाठी त्याचबरोबर हुन्नूर, हुलजंती व पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या साठी येथे मोठ्या प्रमाणात दररोज अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा

प्रकाश बंडगर ज्वेलर्समध्ये डायमंड दागिन्यांचे प्रदर्शन सुरू; ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; मान्यवरांची उपस्थिती

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-   तालुक्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यापारी मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर ज्वेलर्समध्ये हिऱ्यांच्या दागिन्याचे प्रदर्शन व दालनाचा शुभारंभ दिमाखात संपन्न झाला. आमदार सौभाग्यवती वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते दालनाचे उद्घाटन करण्यात आले.        यावेळी प्रकाश बंडगर म्हणाले की, जतसारख्या ग्रामीण भागातील लोकांना हिरे व हिऱ्याचे दागिने खरेदीसाठी सांगली, कोल्हापूर, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये जावे लागते.  मात्र आता जत येथील मे. प्रकाश बंडगर ज्वेलर्स सराफ दुकानात हिरे व हिऱ्याच्या दागिन्याचे दालन सुरू केले आहे. जत तालुक्यातील हे सोन्या-चांदीचे सराफ दुकान असून आता हिरे व हिऱ्यांचे दागिने या व्यवसायात पदार्पण केले आहे. कृष्णा डायमंड या नावाने हे दालन सुरू करण्यात आले आहे. ‌कृष्णा डायमंडचे व्यवस्थापक अमित गाडे यांनी स्वागत केले.        यावेळी विजया बिज्जरगी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मिनाक्षी अक्की, नलिनी शिंदे, मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर ज्वेलर्सचे मालक प्रकाश बंडगर यांचे बंधू चंद्रशेखर बंडगर, सुरेश बंडगर,  जत अर्बनचे संचालक श्रीमंत साळे, बाळासाहेब हुंचाळक

जागर फाऊंडेशन कडून आणखी एक स्तुत्य उपक्रम; नागरिकांच्या मधून कौतुकाची थाप

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत शहरातील गोरगरिबांचे कैवारी व सर्वांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी नगरसेवक परशुराम मोरे, तसेच जागरफाऊंडेशन ह्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या सामाजिक संस्थेकडून आजअखेर अनेक सामाजिक कामे करण्यात आली आहेत.         गेल्या काही दिवसापासून शहरातील शहीद अंकुश सोलनकर चौक ते श्री बसवेश्वर चौक येथे दुभाजकसाठी राखीव ठेवलेल्या चारीमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. तसेच या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आसल्याने आपघाताचे प्रमाण वाढूनये यासाठी जागर फाउंडेशनच्या माध्यमातुन दुभाजकासाठी सोडण्यात आलेली चर  मुजवण्याचा निर्णय जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी हाती घेत कामास सुरवात केली. सध्या चर मुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून. यासाठी जागर फाउंडेशनची टीम काम करीत आहे. तसेच यावेळी पोलिस प्रशासनाचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे.        विजयपूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकासाठी सोडण्यात आलेली चर जिवघेणी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी गणेश पाटील य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गत बंडाळीचा जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते मंडळींनी पक्षांतर्गत भंडारी केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी जत विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे ठाम आहे. उलट जत तालुक्यात आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी आणखीन भक्कम करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहीती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.       सोमवारी एकीकडे अजित पवार गटाने जयंतराव पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याचे कळाल्यानंतर जतेत या घटनेचा राष्ट्रवादीने निषेध नोंदवला. शिवाय जतची अखंड राष्ट्रवादी शरद पवार आणि जयंतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे असेही सांगण्यात आले. यावेळी नेते सुरेशराव शिंदे, मन्सूर खतीब, चन्नाप्पा होर्तीकर, उत्तमशेठ चव्हाण आदीजन उपस्थित होते.       अध्यक्ष रमेश पाटील म्हणाले, अजितदादांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे जत तालूक्यातील पदाधिकाऱ्यांना हा निर्णय पटलेला नाही. ज्या शरद पवार यांनी अखंड हयात घालवून पक्ष उभा केला. अनेकांना वेगवेगळ्या पदावर बसवले

आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेकरावजी कांबळे यांचे उपस्थितीत जत तालुका कार्यकर्ता संवाद बैठक मेळावा संपन्न

Image
केंद्रीय मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचा जत दौरापुर्व नियोजन बैठक जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालूका आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे वतीने केंद्रीय मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचा जूलै महिन्यामध्ये विवीध विकास कामांचे उद्घाटन कार्यासाठी जत तालुक्यामध्ये नियोजित दौरा आयोजित आहे. या दौरा पुर्व नियोजना करीता रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जत वाचनालय भवन येथे आयोजित करणेत आला होता.        यावेळी बैठकीचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान कार्याध्यक्ष संजय कांबळे हे होते. यावेळी विवेकरावजी कांबळे यांचा रिपाइं(आ.) जत तालुका कार्यकारणीचे वतीने शाल अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करणेत आला. तसेच उपस्थित मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करणेत आले.        सर्वप्रथम सर्व महापुरूषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. बैठकीचे प्रास्तविक जत तालुका अध्यक्ष मा. संजय कांबळे/पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त क