Posts

Showing posts from July, 2025

इशारा जनसुराज्यचा, जागे झाले प्रशासन!अभ्यासू नेतृत्वाचे प्रत्यक्ष परिणाम – बसवराज पाटील यांच्या इशाऱ्यानंतर एका दिवसात रस्ता दुरुस्तीला सुरुवात!

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी डफळापूर ते एकुंडी रस्त्याची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली होती. "जर एका दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल", असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता.     संबंधित विभागाने तात्काळ यंत्रणा सक्रिय करत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. जनसुराज्यचे नेते बसवराज पाटील यांच्या सारख्या ठाम व अभ्यासू नेतृत्वामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.     यावेळी बसवराज पाटील म्हणाले की, संघर्ष नसेल तर विकास अशक्य, आणि जबाबदारी घेतली की प्रशासनही हलते. आम्ही जो उठाव करतो त्या उठावाला जनतेतून थोडा जरी प्रतिसाद मिळाला तरी भविष्यात जत तालुक्याचा कायापालट करू, या रस्त्याची अडचण सर्व पत्रकारांनीही उचलून धरल्या बद्दल सर्व पत्रकारांचे व या रस्त्याचे काम ताबडतोब सुरु केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले.

डफळापूर ते एकुंडी रस्त्याची दुर्दशा प्रवाशांचे हाल; तातडीने दुरुस्तीची मागणी; बसवराज पाटील

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     डफळापूर ते मिरवाड, जिरग्याळ मार्गे एकुंडी दरम्यानचा प्रमुख राज्य मार्ग पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच पावसामुळे अधिकच बिकट झालेली अवस्था यामुळे प्रवाशांना प्राण धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.     या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. हा रस्ता सामान्य जनतेच्या रोजच्या वापराचा असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळ सुरू आहे. तसेच पाटील यानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याचे त्वरित सर्वेक्षण करून काम हाती घेण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी केली आहे.     जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जनतेतूनही होत आहे. "जनतेच्या सुरक्षेशी कुठलिही तडजोड सहन केली जाणार नाही, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी!"

जिल्हा बँकेच्या जत तालुक्यातील कार्यक्षेत्रातील शंभर टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव तसेच फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन; संचालक मन्सूर खतीब

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;       जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांच्या कार्य क्षेत्रातील 100 टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव तसेच फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा मंगळवार रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांनी दिली.       खतीब म्हणाले की, जत तालुक्यातील बँकेच्या शाखा कार्यक्षेत्रातील विकास सोसायट्याच्या वसुलीसाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर बँकेच्या हिताचे काम करणारे पदाधिकारी सचिव व फिल्ड ऑफिसर हे योगदान देत आहेत, त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. त्यामुळे सर्वांनी राज डेकोरेट अँड इव्हेंट मँनेजमेंट हॉल, छत्रीबाग रोड जत येथे सायंकाळी ५ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन केले.       यावेळी खतीब यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महांडळ, ऍग्री क्लीनिक अँड अग्री बिजनेस सेंटर, प्रधानमंत्री सु...

स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम ध्येय निश्चित करा; तहसीलदार प्रवीण धानोरकर

Image
राजे रामराव महाविद्यालय, जत येथे विवेकानंद करियर अकॅडमीचे उद् घाटन जतवार्ता न्यूज नेटवर्क;     स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ध्येय निश्चित केले पाहिजे. आपण ठरवलेल्या ध्येयाच्या जिद्दीने व आत्मविश्वासाने पाठलाग केला तरच यश मिळते असे प्रतिपादन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले.      ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या "विवेकानंद करिअर अकॅडमीच्या" उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. प्रारंभी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत यांनी आपल्या प्रस्ताविकात विवेकानंद अकॅडमी सुरु करण्याचा उद्देश सांगितला.       यावेळी पुढे बोलताना तहसीलदार प्रवीण धानोरकर  म्हणाले की, जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नका. परत नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करा. अनेक व्यक्तींनी अपयशातून धडा घेऊन यशाची उंच शिखरे गाठले आहेत. यशस्वी होण्यासाठी मनाला व शरीराला चांगल्या सवयी लावून घ्या. तुम्हाला जर प्...

राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींचा १४ जुलैला विधानभवनावर धडक छत्री मोर्चा;हभप तुकाराम बाबा महाराज | ५० हजार प्रशिक्षणार्थी होणार सहभागी; बालाजी चाकूरकर

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:-     विधानसभा निवडणुकीपूर्वी  राज्य शासनाने राज्यातील एक लाख ३४ हजार बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले. सहा महिन्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला पण आम्ही राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्याची मुदतवाढ दिली. आता प्रशिक्षणार्थीची मुदत संपत आली असून त्यांनी पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित करत युवा प्रशिक्षणार्थीच्या विविध मागण्यांसाठी येत्या १४ जुलैला मुंबई येथील आझाद मैदान ते थेट विधानभवन, मंत्रालय धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम तुकाराम बाबा महाराज यांनी दिली. यावेळी नेते बालाजी पाटील चाकूरकर उपस्थित होते.     हभप तुकाराम बाबा महाराज यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यांचा दौरा केला. युवा प्रशिक्षणार्थीच्या भावना, वेदना समजून घेतल्या. युवा प्रशि...

तुकाराम बाबांनी जपला गाडगेबाबांचा सामाजिक वारसा- मंगेश चिवटे | निसर्गरंग साहित्य संमेलनाला प्रतिसाद

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-       समाजामध्ये वावरताना स्वतःचा स्वार्थ पाहणारे अनेक बाबा अनुभवले पण चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज त्याला अपवाद आहेत. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून दुष्काळ, कोरोना, महापूर असो की तुकाराम बाबांचा पाण्यासाठीचा लढा कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक विचारांचा वारसा तुकाराम बाबांनी जोपासला याचा आम्हाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.     जत येथे सांगली येथील निसर्ग फौंडेशनच्या वतीने सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूरपर्यंत, निसर्गराया भेटूया... चला, विठ्ठल पेरूया... असा एक सायकल प्रवास, निसर्गवारी दोन ते सहा जुलै दरम्यान आयोजित केली आहे. या पर्यावरण संरक्षण संवर्धन वारीमध्ये जतमध्ये संमेलन तसेच शेगाव, बनाळी, अचकनहळळी येथे साधारण एक हजार वृक्षारोपण तसेच पंढरीच्या मार्गावरून जाताना एक लाख बियांचे रोपण करण्यात येणार आले. त्यानिमित्त जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालयात निसर्गरंग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल...

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     राजे रामराव महाविद्यालय, जत येथे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या संकल्पनेतून "एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" हा नवोपक्रम सुरू करण्यात आला. प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांचा वाढदिवस पारंपारिक पद्धतीने साजरा न करता महाविद्यालयाच्या विस्तीर्ण अशा 25 एकर परिसरात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या हस्ते एक वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्याचा नवोपक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सुरु करण्यात आला. यापूर्वीही महाविद्यालयात एक तास ग्रंथालयात, मुक्तपीठ यासारखे नवोपक्रम सुरू सुरू करण्यात आले आहेत. आणि ते उपक्रम विद्यार्थी प्रिय झाले आहेत. या योजनेचे समन्वयक म्हणून स्टाफ सेक्रेटरी डॉ.प्रकाश सज्जन व डॉ.पुंडलिक चौधरी हे काम पाहणार आहेत.      प्रा.धनंजय वाघमोडे, प्रा.कृष्णा रानगर, डॉ.शंकर गावडे, प्रा.सचिन लोखंडे, डॉ.यादवराव मोरे व प्राध्यापिका सौ.शिल्पा पाटील यांचा वाढदिवस महाविद्यालयाच्या अमृतवन व आंबा बागेत वृक्षारोपण करून सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.       यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील ...

राम,कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण हरी च्या गजरात कणबर्गी जि.बेळगाव येथील दिंडीचे जत शहरातील राम रहिम चौकात जोरदार स्वागत

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     कणबर्गी जि.बेळगाव येथील वारकरी दिंडी ही दरवर्षी जत शहरात एक दिवस मुक्काम करून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. कणबर्गी येथून ही दिंडी सोमवार दि.२३ जून २०२५  रोजी निघाली असून १८० कि.मी.प्रवास करून ही दिंडी शुक्रवार दि.४ जुलै रोजी पंढरपूरला पोहचणार आहे.     यावर्षी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी म्हणून ही वारक-यांची दिंडी जत शहरात दाखल झाली. कणबर्गी येथून निघणा-या या दिंडीचे हे सव्विसावे वर्ष असून यावर्षी या दिंडीत दिडशे महिला व पुरूष वारकरी सहभागी झाले होते. या दिंडीतील खास आकर्षण म्हणजे दिंडीमध्ये बैलाचा रथ व त्यामधील श्री.विठ्ठल, रूक्मीणी व श्री.ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व पादुका असल्याने ही दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडीचा रथ फुलानी व विध्दूत रोषणाईने सजविला होता.    दिंडी चालक आप्पाजी महाराज सुंठकर यांनी या दिंडीचे नेटके नियोजन केले आहे. दिंडीप्रमुख ह.भ.प.आप्पाजी सुंठकर महाराज,.सचिव ह.भ.प.धोंडीबा मुतगेकर महाराज, मारूती मुचंडीकर, अप्पय्या गोयेकर, कल्लाप्पा सुंठकर, लक्ष्मी उचगांवकर,रूक्मीणी मलाई, पार्वती अष्टेकर आद...

सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी यांचा ग्रामपंचायत युनियनच्या वतीने सत्कार

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     पंचायत समिती जत अंतर्गत ग्रामपंचायत उटगी गावचे ग्रामपंचायत अधिकारी अरुण शिंदे, मोकाशवाडी गावचे संजय शिंदे व शंकर डोंबाळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम जत पंचायत समिती जत येथील सभागृहात पार पडला.      या कार्यक्रमाप्रसंगी जत पंचायत समिती जतचे सहाय्यक गटविकास अधिकारी माडगूळकर यांनी सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी यांचा सत्कार प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ग्रामीण भागातील विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायत अधिकारी यांना पाहिले जाते. त्यांना कामकाज करित असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यातुन या ग्रामपंचायत अधिकारी यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीने कामकाज केले आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो अदी मनोगत व्यक्त केले. यावेळी जत पंचायत समितीच्या वतीने विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव, युवराज मंडले तसेच ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष प्रविण देसाई, जिल्हा प्रतिनिधी यांनीही सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.      याप्रसंगी डॉ उत्तमराव शिंदे, प्राध्यापक मधुकर शिंदे, दत्तात्...

जत शहरातील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन; प्रकाश व्हनमाणे

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुपणलिकेला अनेक ठिकाणी लागलेली गळती, त्यामुळे जत शहराला होणार अपुरा पाणीपुरवठा, शहरातील उद्यानांमध्ये लावण्यात आलेली खेळणी मोडकळीस आली आहेत. तसेच घंटागाड्यामार्फत शहरातील उचलला जाणारा कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. यासह विविध समस्यांबाबत जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना जत तालुका अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंचचे अध्यक्ष प्रकाश व्हनमाणे यांनी आज निवेदन दिले आहे.     निवेदनात म्हटले आहे की, जत शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बिरनाळ तलावा पासुन ते जत शहराच्या पाणी टाकी पर्यंत अनेक ठिकाणी गळती लागली असुन त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. साठेलेले दुषित पाणी जत शहरास होणाऱ्या पाणी पुरवठा मध्ये मिसळत असल्याने जत शहरातील नागरीकांना दुषीत पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून जत शहरा मध्ये कावीळ, ग्रॅस्ट्रो, चिकनगुनिया या साथीच्या जनते मध्ये प्रार्दुभाव वाढत आहे.     जत शहरा जवळ असणारा बिरनाळ तलाव पूर्ण क्षमतेने काटोकाट भरलेला असताना जत शहरातील ...